आशाताई बच्छाव
मोमिनाबाद येथे ढगफुटी आणि चक्रीवादळामुळे केळी व इतर पिकाचे शंभर टक्के नुकसान
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपूर:-तालुक्यातील मोमिनाबाद रिंगणवाडी या शिवारातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे दिनांक 25 जून 2022 रोजी झालेल्या ढगफुटी पावसामुळे व चक्रीवादळामुळे मोमिनाबाद , रिंगणवाडी येथील शेतकऱ्यांचे केळी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात संपूर्णपणे नुकसान झाले असून केळीचे पीक हे ढगफुटी व चक्रीवादळामुळे पुर्णपणे जमिनीवर लोळले आहे या अचानक झालेल्या चक्रीवादळाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या पायाखाली जमीनच सरकल्यासारखे झाले आहे कारण फार मोठे कबाळ कष्ट करून रात्रंदिवस शेतमावलीत मेहनत घेऊन मोठे केलेले पीक अचानकच झालेल्या चक्रीवादळ व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास काळाने हिरावून घेतल्यासारखे झाले आहे आणि त्याच प्रमाणे काही नव्याने पेरणी केलेल्या सोयाबीन व इतर पिकाचे सुद्धा ढगफुटीमुळे जमिनीतील पेरलेले बियाणे थापटल्या गेले आहे अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कळताच नेहमी प्रमाणेच आपल्या “कर्तव्य दक्षपणाचा” परिचय देत तलाठी कांबळे मॅडम आणि कृषी सहाय्यक मॅडम रविवार सुट्टीच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ढगफुटी पावसामुळे व चक्रीवादळामुळे झालेल्या पिकाची पाहणी केली मोमिनाबाद येथील शेतकरी गजानन मारोडे, निलेश जवंजाळ, अनिल जवंजाळ, सुनील बोरवार व मोमिनाबाद शिवारातील इतर शेतकरी यांचे केळी व इतर पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेल आहे तरी संबंधित अधिकारी यांनी शेतात येऊन नुकसानाची पाहणी केली आणि शिवारातील झालेल्या नुकसानाची उर्वरित पाहणीसाठी उद्या येणार असल्याचे सांगितले.