Home नांदेड मांजरम परिसरात अवकाळी पावसाचा तांडव. विज पडून म्हैस व वासरू जागीच ठार.

मांजरम परिसरात अवकाळी पावसाचा तांडव. विज पडून म्हैस व वासरू जागीच ठार.

162
0

राजेंद्र पाटील राऊत

मांजरम परिसरात अवकाळी पावसाचा तांडव.
विज पडून म्हैस व वासरू जागीच ठार.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
…मांजरम परिसरात सोमवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्या नंतर सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात मेघांचे तांडव सुरू झाले जवळपास पाऊण तास मेघ गर्जने सह अवकाळी जोरदार पाऊस झाला यातच हालक्या गारांच्या पावसाने हजेरी लावली. विजेने मांजरम येथील शेतकऱ्याच्या एका दुपती म्हैस व वासराचा जीव घेतला.
▪️कोरोना विषाणू बरोबरच मांजरम ला अवकाळी पावसाचा पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा फटका
दि.२६ सोमवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले.दिवसभरच्या प्रचंड उकाड्या मुळे मेघ गर्जने सह पावसाला सुरुवात झाली.जवळपास पाऊन तास जोरदार पाऊस पडला.यातच हालक्या गारा बरसल्या. यातच सायंकाळी व सकाळी शेतीच्या मशागतीसाठी शिवारात असलेल्या व्यक्तींना अवकाळी पाऊसा पेक्षा विजेच्या कडकडाटाची भिती मनात होती. ती घटना घडली मांजरम येथील शेतकरी श्रीराम गणपतराव शिंदे यांच्या जागलीवर बांधलेली दुभती म्हैस व तिचे वासरू विज पडून जागीच ठार झाले. तसेच हाळद काढणी सुरू असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केली आहे. तात्काळ महसूल विभागाच्या वतीने शेती पिकांचे पंचनामे करावेत. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Previous articleनायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनाचे अनुकरण जिल्हातील सर्व गावानी करावे- खा.प्रतापराव पा.चिखलीकर
Next articleअवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन सेना आंदोलन करणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here