राजेंद्र पाटील राऊत
स्वतः चे पाप झाकण्यासाठी बेताल आरोप;सरपंचाला राहिले नाही महत्व!
टाकळी येथील धक्कादायक प्रकार..
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या टाकळी गावात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,तेथील आदीवासी समाजाचे सरपंच महेंद्र सोनवणे यांना कुठलेही महत्त्व राहिलेले नसून,त्यांच्या पदाला कवडीचेही महत्व उरले नसल्याने ग्रामपंचायतीकडून सर्रासपणे सावळा गोंधळ सुरु आहे.
युवा मराठाच्या ब्युरो टिमने आज टाकळी गावाला भेट दिल्यावर हा धक्कादायक प्रकार चव्हाटयावर आला आहे.ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींगमध्ये केले जाणारे ठराव हे फक्त कागदोपत्री असून,प्रत्यक्षात कामे मात्र ठरावानुसार न करता वेगळ्या व भलत्याच ठिकाणी करुन बोगस बिले लाटण्याचा हा प्रकार आहे.त्याशिवाय कामे मजुराकडून करण्याऐवजी मशिनरी व्दारे करुन शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने लुटमार सुरु आहे.याबाबत सरपंच महेंद्र सोनवणे यांनी विरोध केल्यावर त्यांना हमरीतुमरी करुन एकेरी भाषेत त्यांना धुडकावून लावले जाते.तर या भागाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विकासनिधीतून योग्य ते कामकाज सुरु असताना मात्र विरोधक एका स्थानिक यु-टुयुब वृतवाहिनीच्या पत्रकाराला हाताशी धरुन टाकळी गावाची व लोकप्रतिनिधीची बदनामी करीत असल्याचे एकंदरीत चित्र या गावात बघावयास मिळाले.म्हणजे विरोधक स्वतः चे पाप झाकण्यासाठी हे कुटील षडयंत्र करीत असल्याचा हा बनाव आहे असे म्हटले तर ते आतिशयोक्तीचे ठरु नये.