राजेंद्र पाटील राऊत
पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) रविवार दिनांक ०७/११/२०२१ रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला असून महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील वडरई गावातील एका माच्छिमाराचा गोळीबारात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या गोळीबारात गुजरातच्या एका मच्छिमाराला गोळी लागून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे.
या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात तणावाचे वातावरण झाले असून राज्य व केंद्र सरकारने त्वरित मृतदेह आणण्याची व्यवस्था करण्याची मागणी मच्छिमारांकडून होत आहे. तसेच पाकिस्तान सैनिकांच्या अमानवी कृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.
दिनांक ०६/११/२०२१ रोजी गुजरात राज्याच्या ओखा बंदर येथील मासेमारी नौका “जलपरी” मासेमारी करण्यास समुद्रात निघाली होती. दिनांक ०७/११/२०२१ रोजी ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे मासेमारी करत असताना पाकिस्तानी सागरी सुरक्षा रक्षकांनी भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला ज्यात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील तरुण मच्छिमार श्रीधर रमेश चामरे, वय ३०, यांचा या गोळीबारत दुर्दैवी मृत्यू झाला असून महाराष्ट्र व गुजरात सरकारने त्वरित पाऊले उचलून केंद्र सरकारच्या सह्ययाने श्रीधर रमेश चामरे ह्यांचा मृत्यदेह सन्मानपूर्वक आणण्याची विंनती मच्छिमारांनी केली आहे.
ओखा येथील मरीन पोलिस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर घटनेची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौकेचे मालक जयन्ताभाई बोखामा ह्यांनी दिली.