राजेंद्र पाटील राऊत
एमपीएससी’च्या नवीन जाहिरातीना लागणार वेळ : विध्यार्थी चिंताग्रस्त!
ठाणे :(अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल)
मराठा आरक्षण, करोनामुळे पदभरतीवरील आर्थिक निर्बंधांमुळे दोन वर्षांपासून ‘एमपीएससी’ने जाहिरात काढलेली नाही. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर उपमुख्यंत्र्यांनी १५ हजार ५११ पदे भरण्याची घोषणा केल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल अशी आशा विद्यार्थ्यांना होती. मात्र, दहा दिवस उरले असतानाही कुठल्याही विभागाने मागणीपत्र न दिल्याने जाहिरातीची अपेक्षा धूसर झाली आहे
शासन निर्णयानुसार प्रशासकीय विभागांनी ३० सप्टेंबरपर्यंत विविध पदांचे मागणीपत्र पाठवणे बंधनकारक असतानाही अद्याप एकाही विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) मागणीपत्र न पाठवल्याने तूर्तास तरी नवीन पदभरतीच्या जाहिरातीची अपेक्षा धूसर झाली आहे. विशेष म्हणजे, उर्वरित दहा दिवसांमध्ये सर्व मागणीपत्र येणे शक्य नसल्याने ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पदभरतीच्या जाहिरातीला नवे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.
स्वप्निलच्या आत्महत्येनंतर उपमुख्यंत्र्यांनी १५ हजार ५११ पदे भरण्याची घोषणा केल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल अशी आशा विद्यार्थ्यांना होती. मात्र, दहा दिवस उरले असतानाही कुठल्याही विभागाने मागणीपत्र दिलेले नाही.
शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मागणीपत्र पाठवायचे आहेत. लवकरच मागणीपत्र मिळणे अपेक्षित आहे. – स्वाती म्हसे पाटील, सचिव, एमपीएससी.