आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; सोमवार १ऑगस्ट २०२२, पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना अटक केली होती. आज ईडीने त्यांना कोर्टात सादर केले, त्या सुनावणी दरम्यान कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ३ दिवसाची कोठडी जाहीर केली. युक्तिवाद करताना संजय राऊत यांच्या वकिलांनी सांगितले की ते हृदयविकाराचे रुग्ण आहेत त्यामुळे त्यांना घरचे जेवण व औषध देण्यात यावे, अशी मागणी केली असता कोर्टाने त्यांना मुभा दिली आहे. ईडी च्या वकिलाने सांगितले की संजय राऊत यांनी दोन साक्षीदारालाही धमकी दिली आहे. चौकशीसाठी सहकार्य करत नाहीत त्यामुळे त्यांना १० दिवसाची कोठडी मागितली होती परंतु कोर्टाने त्यांना ३ दिवसाची कोठडी जाहीर केली. कोर्टाने हेही सांगितले की रावतांना भेटण्यासाठी त्यांच्या वकिलांना सकाळी८:३० ते ९:३० ही वेळ जाहीर केली आहे. रात्री १०:३० नंतर ईडी त्यांची चौकशी करू शकणार नाही असे आदेश दिले. या अटके वरती उद्धव ठाकरे खूप आक्रमण झाले व भाजप सुडाचे राजकारण करत आहे असे त्यांनी सांगितले व त्याचा तीव्र शब्दांमध्ये समाचार घेतला. हे घाणेरडे राजकारण आहे . भाजप शिवसेना संपण्याच्या मार्गावरती आहे ते मी होऊ देणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. संजय राऊत यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले. संजय राऊतांच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्यासाठी करण्यासाठी ईडीने पूर्णपणे ताकद पणाला लावणार आहे. सुनावणी दरम्यान कोर्टाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी चालू होती. संजय राऊत म्हणाले की कर नाही त्याला डर कशाला मी घाबरत नाही असे त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. मी निर्दोष आहे असे, माझे वकील कोर्टात सिद्ध करतील हे त्यांनी सांगितले.