पालघर रिपाई च्यावतीने कोकण पूरग्रस्त भागात मदतीचा हात.
वैभव पाटिल विभागीय संपादक
मा.ना. रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार, व मा.श्री. सुरेशदादा बरशिंगे, निरीक्षक पालघर ठाणा यांच्या सूचनेनुसार आज दिनांक ३० जुलै२०२१ रोजी रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बहुतेक जिल्ह्यात अनेक लोकांची शेती , घरे-दारे , फळबागा उध्वस्त झाल्या तसेच अतिवृष्टीमुळे दरडी कोसळुन व पुरामुळे बरीच लोकं व हजारो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत बहुतेक जिल्ह्यात अशी भयावह परिस्थिती उद्भवली असताना अत्यावश्यक साधन सामग्री ( सर्व प्रकारची औषधे, मोजे, बिस्किटे, पीठ-मीठ, चादरी ब्लँकेट, ह्यांडवॉश , कपडे ) रिपाई (आ)च्या वतीने एक मदतीचा हात म्हणुन रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपुर या ठिकाणी महावीर कुरिअर व इतर कुरिअर मार्फत पाठविण्यात आले या प्रकारचे निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना मा. जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन देण्यात आले. साधन सामग्री ची आहे तसेच अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी यांचे फार मोठे नुकसान झाले आहे अश्या लोकांना तलाठी मार्फत सर्वे करून त्यांची नुकसान भरपाई लवकरात – लवकर देण्यात यावी या मागणीचे सुध्दा निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना देण्यात आले तसेच भविष्यात महाराष्ट्रात कुठेही अश्या प्रकारची परिस्थिती उद्भवली तर रिपाई (आ) पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आयु. सुरेश जाधव व त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक वेळी मदतीचा हात देऊन खारीचा वाटा उचलेल या समयी मा.सुरेश जाधव (जिल्हाध्यक्ष पालघर), सौ.रोहिणी गायकवाड (महिला अध्यक्षा पा जि) , कुंदन मोरे (उपा. पा जि.) , शुभांगी राठोड (समाजसेविका) , सोमनाथ धनगवकर (सचिव) , पुष्कराज फुलारा (जिल्हा संघटक) , शरद जाधव (युवा अध्यक्ष पा ता) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.