राजेंद्र पाटील राऊत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी निधी जमा करण्यात आल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गणेश भोसले या शेतकऱ्यांशी केले संवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून कृषी कायद्याचे पुन्हा समर्थन केले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना ताकद आणि पर्याय मिळेल. असे त्यांनी सांगितले विरोधकांचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न असून शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम सुरू आहे. असेही पंतप्रधान यानी विरोधकांवर निशाणा केले आहेत. तसेच ममता बॅनर्जीमुळे बंगालमधील शेतकऱ्यांपर्यंत केंद्राच्या योजना पोचलेल्या नाहीत. असे ममताबॅनर्जी वर पंतप्रधान यांनी हल्ला केला आहे. संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज देगलूर