Home कोल्हापूर दुर्गंधीयुक्त कचरा असलेल्या जागी लोकसहभागातून वृक्षारोपण

दुर्गंधीयुक्त कचरा असलेल्या जागी लोकसहभागातून वृक्षारोपण

208
0

राजेंद्र पाटील राऊत

दुर्गंधीयुक्त कचरा असलेल्या जागी लोकसहभागातून वृक्षारोपण

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील नागोबा वाडी येथील अनेक वर्षापासुन कचरा व घाण पडून दुर्गंधी युक्त असलेला भाग लोक सहभागातून स्वछ करून , त्या जागेवरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्याचा निर्धार करून पडीक व दुर्गंधीयुक्त जागेचा चांगल्या प्रकारे राबवण्याची संकल्पना
वडगांव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालुन सदरची जागा स्वच्छ करून , जागेभोवती जाळीचे कंपौड करून त्या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यात आले .
भविष्यात त्या जागेवर बाग बगीच्या करण्यात येणार आहे.
या वृक्षारोपणाचा शुभारंभ चेअरमन श्री.सर्जेराव माने सर व युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला .
तसेच प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी
छत्रपती राजाराम साखर कारखाना चेअरमन श्री. सर्जेराव माने सर , उपनगराध्यक्ष श्री .संतोष उर्फ बंडा चव्हाण ,नगरसेवक श्री.गुरूप्रसाद यादव, श्री.संतोष ताईगडे , गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री.विजय भोसले,श्री. सुनिल पाटील, श्री.मोहन माळी , श्री .निलेश घारसे, श्री.अमोल पाटील, मनसेचे श्री.अमित पाटील, श्रीकांत ठीगळे, श्री.रामदास यादव, श्री.सचिन पन्हाळकर,श्री नंदु गुरव, श्री.अमोल यादव,श्री. प्रविण पाटील, श्री.संताजी पाटील,डॉ.अमोल पाटील,अभि दीगे, अनिल पाटील,यासह निसर्ग प्रेमी व या भागातील नागरिक उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा             
Next articleभारतीय जनता पार्टी नाशिक भटके विमुक्त आघाडीची कार्यकारणी जाहीर.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here