राज्यातील सर्व विभागातील एस.टी.कर्मचाऱ्यांना मुंबईच्या सेवेसाठी विविध आगारातुन चालक , वाहक , यांञिक आणि पर्यवेक्षक टिम बोलावून , त्यांच्याकडून बेस्ट अंतर्गत सेवा करून घेतली आहे , पण कर्मचाऱ्यांना मुंबईला सेवा बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांला जबरदस्तीने पाठवण्यात आले न गेल्यास निलंबनाची कारवाई करण्याच्या भितीपोटी गेलेल्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवन देण्यात आले , जेवनाबद्दलच्या तक्रारी नंतर निकृष्ट दर्जाची दखल घेत , प्रशासनाने प्रती दिन भत्ता देण्याची व्यवस्था केली .
पण आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरच आहे
याकडे प्रशासन लक्ष घालणार केव्हां
मुंबईत जावुन सेवा बजावणाऱ्या एस.टि.कर्मचारी ,
“कोव्हिड-19 चे पाँझिटिव्ह ” रूग्ण
होत आहेत.
वेतनात होणारी अनिश्चितता ,
त्यात ३१ मार्च ला २०१६ चा करार संपला कोविड पण कोविड 19 मुळे
२०२० ते २०२४ च्या कराररावर ही पाणि सोडावे लागले. चार वर्षातून एकदा होणारी तिही थांबली !
सेवा बजावयाला घरापासून दूर जायचं , त्यात जर करोनाग्रस्त झालेल्या एस.टि. कर्मचाऱ्यांना , एस.टि. प्रशासनाकडून कुठलीच सोय नाही,
ना कर्तव्ये पार पाडतांना आरोग्य साम्रुग्रीचा पुरवठा नाही,
करोनाग्रस्त झालेल्या एस.टि कर्मचाऱ्यांना “मेडिक्लेम“
ची सुविधापण नाही , महत्त्वाचे म्हणजे करोना ग्रस्त आवस्थेत इलाज करण्यासाठी दाखल झालेल्या एस.टि.कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत सोडा,साधा स्थानिक अधिकाऱ्यांकडून चौकशीही केली नाही , कारण करोनाग्रस्त झालेल्या एस.टि.कर्मचाऱ्यांची साधी माहीती स्थानिक पातळीवर अद्यावत ठेवण्याची साधी तसदी पण अधिकारीवर्ग घेत नाही.
एस.टि. कर्मचाऱ्यांकडून काम साधून ,कोरोनाग्रस्त झालेल्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते.
आणि हिच ती एस.टि. प्रशासनाची स्लो पाॕयझन मध्ये हत्या करण्याची अद्यावत पद्धत
ना नियमित वेतन , ना इलाजाला आर्थिक मदत , ना आरोग्य सामुग्रीची उपलब्धता ,
ना करोनाग्रस्तांची नोंद ,
ना आस्था एस.टि.
कर्मचारी मारला जातोय अहिस्ता ,अहिस्ता..
या आघाडी सरकारने गांभीर्याने एस.टी.कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क.