Home Breaking News संध्याकाळी ९ नंतर फटाके फोडल्यास होणार कारवाई, जिल्हाधिकारी दौलत देसाई

संध्याकाळी ९ नंतर फटाके फोडल्यास होणार कारवाई, जिल्हाधिकारी दौलत देसाई

167

जिल्ह्यात हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे , जिल्हाधिकारी दौलत देसाई.
दिपावली सणाच्या दरम्यान सायंकाळी सात ते संध्याकाळी नऊ पर्यंतच फटाके फोडण्यात याची परवानगी देण्यात आली आहे. हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करा ,अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.
महानगरपालिका व सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हरीत लवादाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाके वाजवणे किंवा फोडण्यासाठी सायंकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी आहे. इतर वेळी किंवा रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
हरित लवादानुसार शोभेची दारु (फटाका) विक्री व त्याच्या वापराबाबत आदेश दिलेले आहेत.
पुणे, मुंबई , सांगली जिल्ह्या पाठोपाठ आता कोल्हापुरातही हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र अद्यापही तो पूर्णपणे संपला, असे म्हणता येत नाही. तसेच दिवाळीदरम्यान जिल्ह्यातील आणि शहरातील हवा शुद्ध राहावी यासाठीही लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. फटाके फोडण्याची ऐवजी दिवे लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

युवा मराठा न्यूज ब्युरोचिफ कोल्हापूर .

Previous articleडाँ.सायरस पूनावाला’ इंटरनॅशनल स्कूल च्या 23 विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेशपूर्व परीक्षेत नेत्रदीपक यश
Next articleकोरोनामुळे यावर्षीचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.