Home Breaking News *राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर नाक्यावर गती रोधक बसविण्याची मागणी* *अनेक निश्षाप जिवांचा...

*राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर नाक्यावर गती रोधक बसविण्याची मागणी* *अनेक निश्षाप जिवांचा जातोय बळी*

120
0

*राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर नाक्यावर गती रोधक बसविण्याची मागणी* *अनेक निश्षाप जिवांचा जातोय बळी* अहमदनगर, (प्रतिनिधी, प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे युवा मराठा न्युज नेटवर्क)- अहमदनगर -मनमाड हायवे वर मध्यवर्ती ठिकाणी राहुरी फॅक्टरी हे गाव आहे, रोड च्या पलीकडे व पलीकडेही मोठया प्रमाणात लोकसंख्या आहे, आणि त्यात चौफुली च्या पलीकडे एक नामांकित व नावाजलेले डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल आहे ,त्या हायस्कूल मध्ये यु के जी पासून ते इयता १० वी पर्यंत हजारोंच्या संख्येने विद्यार्धी शिक्षण घेत असतात, व काही विदयार्थी ,मोटार सायकल ने तर काही रिक्षाने ,तर काही बसने तर काही विद्यार्थी पायी प्रवास करून ज्ञान ग्रहण करण्यासाठी सर्वांची शाळेत जाण्यासाठी सकाळी एकच धांदल उडत असते,व दुपारी साधारण सदर विद्यालय साधारणपणे 3,30 च्या दरम्यान सुटते ,त्या वेळी देखील या चिमुरड्यांच्या पोटात कावळे कोकलत असल्यामुळे पोटाची भूक भागविण्या करीता गाड्या घोड्यांची पर्वा न करता घराकडे धाव घेत असतात ,आणि नेमके या महामार्गावर गाड्या या अगदी तुफान वेगाने धावत असल्यामुळे व गतिरोधक नसल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता असते, या पूर्वी देखील या चौफुलीवर अनेक जीवांचा बळी गेला आहे,सध्या लॉक डाऊन मूळे विद्यालये बंद आहेत, तो भाग वेगळा आहे, परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्र् शासनाच्या संबंधित खात्याने या बाबीचा गांभीर्याने विचार करून त्वरित गतिरोधक बसवुन या निश्ष्पाप जीवांचा जाणारा बळी थांववा वा ,अशी मागणी विद्यार्धी व पालक वर्गातून करण्यात येत आहे

Previous article*अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने “बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा” लाभ घ्यावा:- राजु कुरेशी*
Next article*शारिरीक , मानसिक त्रासाला* *कंटाळून विवाहितेची आत्महत्या*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here