आशाताई बच्छाव
माणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने प्रवाशांचे तसेच वाहन धारकांचे हाल
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क )
परभणी :- जिंतूर मार्गावरील माणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.तसेच रस्ता लहान असल्याने वाहणे चालवणे ही अवघड झाले आहे.
बामणी परिसरातील अनेक गावांचे येलदरी धरणामुळे पुनर्वसन झालेले आहे.बामणी, अंबरवाडी, संक्राळा, कोलपा, कुंबेफळ, सावंगी(भां), या सह ०६ गावे व सदर गावकर्यांची हजारो एक्कर शेती येलदरी धरणामुळे पाण्यात गेली आहे. शासनाने पाहिजे तसा शेतीचा मोबदला तर दिला नाहीच आणि झालेल्या पुनर्वसनासाठी योग्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.त्यात या गावांना तालुक्याच्या ठिकाणी दळण-वळणासाठी जाण्यास चांगल्या रस्त्याची व्यवस्था सुद्धा केलेली नाही.खराब रस्त्यामुळे अनेक महिलांच्या प्रसूती या रस्त्यावर झाल्याचे उदाहरणे आहेत.दुचाकीस्वार यांचे मान,पाठ,कंबरडे मोडले आहे.कधी या रस्त्याची दुरूस्ती आली तर स्थानिक चे नेतेमंडळी हे काम कंत्राटदाराकडून घेतात आणि काम थातूरमातूर करून बिले उचलतात असे प्रकार बर्याच वेळा झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर येऊन पाहणी करून हा रस्ता त्वरित मंजूर करून रुंद व मजबुतीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.