आशाताई बच्छाव
मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व नागरीकांच्या घरांची आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली पहाणी
शत्रुघ्न काकडे पाटील:- ब्युरो चीफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)
(परभणी)जिंतूर :-तालुक्यातील वाघी, धानोरा, वडी शिवारात शुक्रवारी २४ जून रोज दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची व नागरिकांच्या घरांची सायंकाळी सातच्या सुमारास जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी पाहणी केली.
दरम्यान यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुन संबधितांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. शुक्रवारी सायंकाळी वाघी, धानोरा, वडी परिसरात ढगफुटी सदृश्य दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
काही वेळातच या पावसामुळे जमिनीवरुन अर्धा फुट पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्यांनी शेतीत नुकतीच पेरणी केलेल्या जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे संबधित शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या पावसाने अनेकांच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळताच आमदार मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी २४ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास लागलीच संबधित गावाना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
याप्रसंगी नायब तहसीलदार ओमप्रकाश घोंगडे, मंडळ अधिकारी जाधव, सरपंच माधव पवार, सरपंच सुदामराव गायकवाड, गणेश गायकवाड, किसनराव गायकवाड, माऊली गायकवाड, कैलास खंदारे, सखाराम गायकवाड, गजानन बारबिंडे, अविनाश चव्हाण, . वडीचे सरपंच संजय पवार, . शिवाजीराव साईंदे, पोलीस पाटील सुभाष पवार, विष्णूपंत पवार, महादेव पवार, बद्रीनाथ पवार, मदन पवार, केदार पवार याच्यासह वाघी धानोरा, वडी गावातील शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.






