आशाताई बच्छाव
बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची गैरसोय
शत्रुघ्न काकडे पाटील:- ब्युरो चीफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)
(परभणी)जिंतूर तालुक्यांतील कावी, बोरगीळवाडी, दहेगाव,कुर्हाडी, पिंपळगाव,भोसी,शेवडी या भागातून विद्यार्थीनींनीसाठी असणारी मानवविकास योजनेतंर्गत बससेवा यावर्षी कधी सुरु होणार? असा प्रश्न विद्यार्थीनींमधुन उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत येण्यासाठीचा प्रवास सुरक्षीत व्हावा या दृष्टीने शासनाने ही योजना सुरु आहे. परंतू शाळा सुरु होऊन चार दिवस झाले तरी देखील सावित्रींच्या लेकींची गैरसोय मात्र प्रशासनाला दिसत नसल्याची केली खंत पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
जिंतूर ते कावी या परिसरात विद्यार्थीनींना शाळेला प्रवास करण्यासाठी बससेवा हे महत्वाचे माध्यम आहे. परंतू परिवहन महामंडळाची बससेवा ही वेळेवर नसल्याने विद्यार्थीनींना बराच वेळ ताटकळत बसावे लागत आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणे खर्चीक व असुरक्षित असल्यामुळे अनेक विद्यार्थीनी बसअभावी शाळेत गैरहजर राहत आहेत. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने मानवविकास बससेवा सुरु करावी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा ही नियमीतपणे सुरु ठेऊन ग्रामीण भागातील जनतेची होणारी गैरसोय कमी करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरीकांतून करण्यात येत आहे