आशाताई बच्छाव
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची व संविधान घरोघरी पोहोचविण्याची गरज –आंबेडकरी विचारवंत नितीन कारेमोरे
संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा( प्रतिनिधी)आज दिनांक १३ एप्रिल 2024ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास नितीन कारेमोरे आंबेडकरवादी विचारवंत व शिवचरित्र प्रसारक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची व संविधान प्रत्येक घरात पोहचण्यासाठी गरज असल्याचे प्रतिपादन भोजापूर येथे मैत्रेय भीम बुद्ध जयंती समारोह समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णुजी मडावी होते तर प्रमुख पाहुणे गौतम मेश्राम, वैद्य सर , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ प्रज्ञा घोरपडे यांनी केले. आभार खोब्रागडे सर यांनी मानले. तसेच या कार्यक्रमासाठी किरण मेश्राम सर ,राहुल बोरकर उद्धवजी बडोले, मिलिंद जनबंधू घोरपडे, बारसागडे सर आणि प्रमोद वानखेडे यांनी अतिशय परिश्रम घेतले .त्यानंतर संविधान भारती यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला . त्यांनी आपल्या समाज प्रबोधनातून समाज एक संघ कसा राहिलाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे कार्य त्याबद्दल प्रसंसनीय गीत गायन केले.