आशाताई बच्छाव
बेबरा येथील जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी..
देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)
देगलूर प्रतिनिधी ; देगलूर तालुक्यातील बेबरा येथील प्रधानमंत्री जलजीवन पेय जल योजना या कामांमध्ये करोडो रुपयाची अपरात्र झाल्याने या कामाची त्वरित चौकशी करून पेजल योजनेतील भ्रष्टाचार थांबविण्याची मागणी उमेश श्रावणराव पाटील शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
देगलूर तालुक्यातील बेबरा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री जलजीवन योजनेचे जवळपास दोन करोड रुपयांचे काम मंजूर झाले आहे या कामात सुरुवात करण्याच्या अगोदरच ठेकेदारा मार्फत सरपंच अशी संगणमत करून वरील कामाकरता गावकऱ्यांची समिती गठित केलेली नाही आणि मागील महिन्यात 90 लाख रुपयाची बँकेतून उचल करण्यात आलेली आहे त्याचा नंतर गावातील जुन्या योजनेचे पाईप व इतर साहित्य वापरून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येतात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदरील कामासाठी शासनाचे कोणतेही अभियंताचे जाय मोक्यावर दौरा झालेला नाही कामाची पाणी तर नाहीच त्यामुळे दर्जाहीन काम होत आहे त्यामुळे येथील संबंधित ठेकेदाराच्या कामाची गुण नियंत्रक समितीच्या मार्फत त्वरित कामाची चौकशी करून ठेकेदारास काळे यादीत टाकून अनामत रक्कम जप्त करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे व गावातील नागरिकांसाठी शासकीय योजनेचे काम दर्जेदार करून देण्यात यावे जेणेकरून शासनाची सदरील कामाची दुसऱ्यांदा गरज पडणार नाही .
या प्रधानमंत्री जलजीवन पेय जल योजनेच्या कामाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा दिनांक 26 मार्च रोजी जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर उमेश श्रावणराव पाटील शिंदे बापूराव शिवाजीराव बामणे, विष्णुदास प्रकाश पाटील, आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.