आशाताई बच्छाव
कायद्यात दुरूस्ती करून केंद्र सरकारने मराठ्यांना टिकाऊ आरक्षण द्यावे – डॉ संजय लाखेपाटील
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: कायद्यात दुरुस्ती करुन केंद्र सरकारने मराठ्यांना टिकाऊ आणि शाश्वत आरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी गुरुवारी मुंबईतील दादरच्या मराठा मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी मराठा समाजाला शाश्वस्त आणि टिकावू मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठ्यांना आरक्षण देण्यास खालील मागण्या करण्यात आल्या-
1) राज्याला 50% पुढील आरक्षण देण्याचे अधिकार नसतांना पुन्हा नव्याने एससीबीसी_२०२४ हा
जुनाच कायदा नव्याने मंजूर केला आहे.! हा कायदा टिकणारच नाही याबद्दल विधीज्ञ, जाणकार आणि सर्वसामान्य मराठा बांधवात एकमत असून आपली सार्वत्रिक फसवणूक केली आहे अशी राज्यभर मराठा समाजाची भावना असून त्याच्या वेगवेगळ्या मार्गाने अतिशय गंभीर प्रतिक्रिया समाजात उमटत आहेत आणि हे आरक्षण आम्ही नाकारत आहोत असे सकळ मराठा समाज अतिशय धाडसाने आणि जबाबदारीने जाहीर बोलत आहे. आणि याचे अतिशय दुरगामी परिणाम महाराष्ट्राच्या समाजजीवनात आणि विशेषतः तरुण मराठा समाज बांधवात उमटत आहेत म्हणून आम्ही राज्यसरकारला या संदर्भात अतिशय गंभीरपणे विनंती करत असून राज्यसरकारने मराठा समाजाला शाश्वत, टिकावू, कायदेशीर, घटनात्मक आरक्षण दिले पाहिजे ही आमची अतिशय रास्त आणि आग्रही मागणी असून वस्तुतः तसे 50% पुढील आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला नाहीत. म्हणून राज्यसरकारने मंत्रीमंडळाचा बैठकीत ठराव करून हेच आरक्षण केंद्र सरकारने EWS कायद्यात दुरूस्ती करून अतिशय सोप्या पध्दतीने द्यावे अशी आग्रही मागणी करत असून असा ठराव करीत आहेत.