आशाताई बच्छाव
संग्रामपूर तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा लहरीपणा; अनेक पिकांच नुकसान शेतकरी संकटात!. ब्युरो चीफ बुलढाणा (ज्ञानेश्वर पाटील दांदळे) संग्रामपूर तालुक्यातील बहुतेक गावात अवकाळी पावसाने दिनांक 26 फेब्रुवारी च्या सायंकाळ पासून मेघगर्जनेसह वारा व पावसाने सुरुवात केली परंतु फक्त पाऊसच नव्हे तर बऱ्याच गावात गारपिटीचा ही वर्षाव झाला. निसर्गाचा अनियमितपणे पडणारा पाऊस हा नुकसानीचा व जीवघेणाच ठरतो. संग्रामपूर तालुक्यात पडलेल्या गारपीटीच्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी केल्याचे दिसून येते अक्षरशः हरभरा गहू ज्वारी,मंका, कांदा अशा अनेक रब्बी पिकांचे नुकसान हे अवकाळी वारा,पाऊस व गारपिटीने केले असून यामध्ये वरवट, एकलारा, मारोड, लाडनापूर अश्या अनेक गावात रब्बी पिकांचे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात पडला असून शासन स्तरावर लवकरात लवकर सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू आहे खरंच या देशाचा अन्नदाताचं जर निसर्गा पुढे हतबल झाला असेल आणि वारंवार निसर्ग जर अन्नदात्याच्या तोंडातील घास हिसकावून घेत असेल तर अशा वेळेस लोकप्रतिनिधीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर भरीव मदत मिळवून देण्याकरता पाठपुरावा करणे गरजेचे आहे.