आशाताई बच्छाव
मराठवाड्यातील सर्व ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड दि:२० सर्व ठेवीदारांची एकी आणि सर्वसामान्यासाठी हातात घेतलेला लढा यामुळे आपल्याला काही अंशी यश मिळाले आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या वतीने उद्याच्या ०५ मार्चपासून ठेवी वाटपाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले असून जे लोकं ठेवीदारांचे पैसे देणार अशांचा आम्ही जाहीर सत्कार करू परंतु वेळ जर पाळली नाही तर गाठ जनतेशी आणि माझ्याशी राहील असा इशाराही प्रा. उबाळें यांनी दिला आहे. मराठवाडा दौऱ्या प्रसंगी शिरूर येथील गाठीभेटी दौऱ्यावेळी प्रा. उबाळे बोलत होते. यावेळी हजारो ठेवीदारांची त्यांनी संपर्क केला असून सर्वांच्या ठेवी परत मिळेपर्यंत लढा चालूच राहील असेही त्यांनी सांगितले आहे. सर्वसामान्यांच्या ठेवी मिळवण्यासाठी बीड स्वाभिमान संघटनेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिजाऊ, ज्ञानराधा, राजस्थानी, साईराम, मराठवाडा अर्बन (माजलगाव), मातोश्री, परिवर्तन, लक्ष्मीमाता, शुभकल्याण, द्वारकादास नागरी सह. बँक यासह इतरही काही बँकांचा व्यवहार संशयास्पद आढळून येते असल्याची चर्चा सुरू झाली आणि बघता बघता बीड जिल्ह्यातील सहकारातील वातावरण गढूळ झाले. तब्बल ०७ दिवसांचे आमरण उपोषण केल्यानंतर बँकवाल्यांना जाग आली त्यांनी ठेवीदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. विशेष म्हणजे काहींनी ठेवी तात्काळ वाटप सुरू केली परंतु ती पुरेशी नाही. ज्ञानराधाच्या बाबतीत सुरेश कुठे यांनी देखील पुढे होऊन त्यांचे पैसे आले आहेत आता उद्याच्या ०५ मार्च पासून सर्वांना पैसे मिळतील असे सांगितले आहे. खरंच त्यांनी ०५ मार्चला पैसे वाटप चालू केले तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचा जाहीर सत्कार करू. त्यांचाच नाही तर ज्या कोणी बँकवाल्यांनी सर्वसामान्यांचे पैसे अडकून ठेवले आहेत आता वाटप चालू करणार आहेत. त्यांना आम्ही भेटून त्यांचे स्वागत करू असेही प्रा. उबाळे यांनी म्हटले आहे. परंतु अगोदर सर्वसामान्य ठेवीदार खूप अडचणीत आलेले आहेत. संपूर्ण मराठवाडा दौरा केल्यानंतर त्यांचे दुःख, यातना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहितल्या आहेत. भविष्यामध्ये कुठल्याही बँकेवर विश्वास ठेवताना आता लोक विचार करणार हे मात्र निश्चित आहे.