आशाताई बच्छाव
मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मायबोली मराठी अस्मिता जोपासली जावी
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
महाराष्ट्राला अनेक थोर, महान साधुसंतांचा सहवास लाभला आहे. त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत मी जन्माला येणे स्वतःचे अहो भाग्य.महाराष्ट्राला अनेक थोर, महान साधुसंतांचा सहवास लाभला आहे. त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत मी जन्माला येणे स्वतःचे अहो भाग्य समजते. कारण या मातृभूमीला अनेक महान व्यक्तीचा अविस्मरणीय आणि अवर्णनीय इतिहास आहे. या पुण्यभूमीचा वारसा लाभले ही एक अतिशय अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कर्तृत्वाचा महान वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक ठिकाणी शुर, धाडसी, चपळ मावळ्यांचे रक्त सांडले आहे. आणि ही भूमी पावन झाली आहे. स्वराज्य घडविण्यासाठी किती संघर्ष करावा लागला त्यांना. दिवस रात्र ध्येयाच्या पाठीमागे लागले म्हणून तर त्यांच्या प्रयत्नामुळेच आपण आज स्वातंत्र्य उपभोगू शकतो.
ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रगल्भ ज्ञानामुळे तर आपल्याला अनेक महान विचार मिळाले आणि त्या विचारांना जर आपण सर्वांनी कृतीत उतरवले तर त्यामुळे आपल्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होणार आहे. अशा महान विचारवंताची पार्श्वभूमी लाभलेला महाराष्ट्र हा पूर्ण जगात गाजला आहे. संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत तुकारामांचा तुकाराम गाथा, व्यास यांचे महाभारत, वाल्मिकींचे रामायण, श्री. चक्रधर स्वामींचे लिळाचरित्र, श्रीकृष्णाची गीता, असे अनेक महान ग्रंथ या भूमीमध्ये उगम पावले. आपण त्याचे व्यावहारिक उपयोजना करून त्याच्या पावित्र्याचे रक्षण केले पाहिजे. वेद आणि उपनिषदांचा महिमा आपणास लाभला आहे.
रामभाऊ आवारे
राज्य प्रसिध्दी प्रमुख युवा मराठा महासंघ