आशाताई बच्छाव
ज्यांचं लेकरू त्यानेच बारसं करावं: नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका, अमरावती श्रेयवादाचि लढाई.
—————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
रस्त्याच्या भूमिपूजन वरून नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपुर रस्त्याची भूमिपूजन खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर या दोन्ही नेत्याकडून करण्यात आले. दोन दिवसाआधीआ. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या रस्त्याचे भूमिपूजन पुन्हा खा. नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाचा लढाई सुरू झाल्याचा पाहायला मिळतोय. यावेळी बोलताना खा. नवनीत राणा यांनी आ. यशोमती ठाकूर यांच्या टीका केली आहे. त्या म्हणाल्या”ज्यांच्या लेकरू त्यानेच बारसं करायला हवा,, उगाच शेजारच्यांनी येऊन बारसा करू नये. त्यावर प्रतिउत्तर देत आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक जवळ आल्याने हीरोइन मटकून राहिले आहे. ज्यांचे लेकरू त्यानेच बारसं करावे असे म्हटल्यावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड आरोपांची फआइलच उघडली आहे .खा. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशान साधत टीका केली. त्यांनी म्हटले की, ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजाऱ्यांनी नाही. ननदबाई आहे त्यांना झेलावेच लागेल. असा टोला देखील नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला. तर तर याबाबत आ. यशोमती ठाकूर यांनी खा.नवनीत राणा यांच्यावर उलट प्रति उत्तर दिले आहेत,२०२४च्या लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे हीरोइन मटकुन राहिली, पण काम नाही अस जोरदार हल्लाबोल आ. यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थसंकल्प २०२२ते२०२३ अंतर्गत या रस्त्याचे काम करत असल्याचा खासदार नवनीत राणा यांच्या फलकावर आहे तसेच २०२३ते२०२४ अर्थसंकल्पातर्गत या या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचा उल्लेख आ. यशोमती ठाकूर यांच्या भूमिपूजनाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे.