आशाताई बच्छाव
अपघातात मृत्यू झालेल्या जवानाला शासकीय इतमात अखेरचा निरोप
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/पाटोदा दि:२८ जानेवारी २०२४ पाटोदा तालुक्यातील जवळाला येथील सैन्यदलात कार्यरत जवान ज्योतीराम हनुमंत जाधव वय ३५ वर्षे हा किरकोळ सहा दिवसाची सुट्टी घेऊन गावातील धार्मिक कार्यक्रमासाठी आले असता २६ जानेवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाला होता. दिनांक २७ जानेवारी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा तालुक्यातील जवळाला येथील सैनिक ज्योतीराम हनुमंत जाधव हे कर्तव्यावर असताना घरच्या देवीच्या देवीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी किरकोळ सहा दिवसाची रजा घेऊन गावी आले होते. ते पाटोदा येथे कामानिमित्त आले होते जेव्हा रात्री १२ वाजता आम्ही उरकून गावाकडे जात असताना बीड-नगर शंभर चिरा येथे खडीचे नादुरुस्त टिपरला मागून दूचाकी जोरदार धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे आज सकाळी पाटोदा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मराठा बटालियनचे आर्मी ऑफिसर, पाटोदा पोलीस प्रशासन, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कर्नल कल्याण डोरले, आ.सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस, माजी सभापती महेंद्र गर्जे, आनंद जाधव, राहुल जाधव, पत्रकार विजय जाधव, हमीद खान पठाण बंटी नलावडे,सुनील कौठेकर, आजी माझी सैनिकांनी व हजारो नागरिकांनी सश्रुनयनाने अखेरचा निरोप दिला.