आशाताई बच्छाव
लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदार जनजागृती आवश्यक
-तहसीलदार राजाभाऊ कदम
देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)
देगलूर :-लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदार जनजागृती करणे आवश्यक आहे. नवमतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्काचे महत्व व पावित्र्य लक्षात घेऊन मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावला पाहिजे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आपल्यातील नेतृत्वाचा गुण विकसित केला पाहिजे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहिमेत योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले.
ते अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि तहसील कार्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमातप्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार , उपप्राचार्य प्रा.उत्तमकुमार कांबळे नायब तहसीलदार बालाजी सुरणार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. बालाजी कतुरवार यांनी केले तर आभार डॉ. संजय देबडे यांनी मानले . याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. खंदकुरे व्यंकट ,प्रा.काळे विनोद ,प्रा. गणेश क्यादारे ,प्रा.संतोष वानोळे ,प्रा.ज्ञानेश्वर कोकणे, तहसील संतोष हुंडे , हनमंत नुकुलवार, संदीप कांबळे , किशोर महिंद्रकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.