आशाताई बच्छाव
आखेर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत लेंडी धरणग्रस्त संघर्ष समितीची बैठक संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी
मागील 37 वर्षापासून प्रलंबित असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्ताने अखेर आपली समस्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. मुंबईत लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकार निश्चितपणे लेंडी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिष्टमंडळास दिला.
यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, शेतकरी संघटनेचे नेते मा.श्री . गुणवंतराव पाटील हागरगेकर मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर , सुरेश पंदिलवार, सुभाष अप्पा बोधने,लेंडी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर, दिनेश आप्पा आवडके ,संदिप पाटील अतनुरे उमाकांतराव वाकडे, गुणवंतराव पाटील, मोतीराम आईलवाड ,महादेव आप्पा पंचडे बालाजी पाटील,निळकंठ पाटील देवकत्ते, एकनाथराव पाटील भाटापूरकर, आनंदराव येरेवाड, निळकंठ पाटील कोळनूरकर, शिवा पाटील भासवाडीकर सुधाकर पाटील हसनाळकर,, बाबुराव पाटील शेळके आदींची उपस्थिती होते
शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.