आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यात बोचरी थंडी रब्बीतील पिकासाठी लाभदायक, सर्वात कमी ११ अंश तापमानाची नोंद.
———–
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून शहरासह जिल्ह्यात हुडहुडी भरवणारी थंडी सुरू आहे. आज सोमवारी दुपारी रात्री गारठा अधिक वाढला. दरम्यान मंगळवारी पहाटे तर दुसऱ्या थंडीचा अनुभव शहरात येत होता. या हंगामातील सर्वात कमी ११ अंश तापमान मंगळवारी (दी.१९) पहाटे येथील जलविज्ञान प्रकल्प नोंद झाली आहे. मागील आठवड्यापासून किमान व कमाल अशा दोन्ही तापमानात घट आली आहे. मागील आठवड्यात दोन दिवस पारा १२.५ अशा पर्यंत खाली घसरला होता. मात्र मंगळवारी तर पारा ११ अंशावर आला होता. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत होता. आणखीन काही दिवस अमरावतीकरांना अशा बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. हिमालया सुरू असलेले हिमव्रुष्टी तसेच उत्तरेकडून वाहत येणारे थंडे वारे आणि मध्य प्रदेशातील थंडीची लाट या सर्व कारणामुळे सध्या अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. या बोचऱ्या थंडीमुळे रब्बीच्या पिकांना लाभ होणार आहे. एक पाहिजे कारण थंडी असली तरीही सध्या स्थिती धोके नाही. वातावरण ढगळ नाही. त्यामुळे पिकांना ही थंडी फायदेशीर आहे, अशी माहिती कृषी हवामान तज्ञांनी दिली आयुष्याखाली गेल्यास पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. सध्या असलेली थंडी गहू, हरभरा तसेच इतर रब्बी पिकासाठी फायद्याची आहे. मात्र तापमान १० अंशाखाली गेल्यास पिकांना थोड्या प्रमाणात रात्रीच्या वेळी सिंचन करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा पिकांना होईल असे डॉक्टर सचिन मुंडे कृषी हवामान शास्त्रज्ञ अमरावती यांनी माहिती दिली.