आशाताई बच्छाव
अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाध्यक्षपदी खांदेशच्या
डॉ सौ साधना निकम यांची सार्थ निवड
.. चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील ………………………………………..
अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र मुख्यालय – अकोला आयोजित
६१ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन अकोला येथे दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होत आहे. त्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून चाळीसगावच्या रहिवाशी प्राचार्य डॉ सौ साधना शामकांत निकम यांची निवड झाली आहे. खान्देशचा अभिमान आणि बहुमान खऱ्या अर्थाने वाढला आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉक्टर संतोषजी हुसे असून स्वागताध्यक्ष प्रा.ललितजी काळपांडे राहणार आहेत. या निवडीबद्दल केंद्रीय अध्यक्ष तथा हास्य कवी हिम्मतजी ढाळे , तुळशिरामजी बोबडे आणि केंद्रीय कार्यकारिणीने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगावचे प्रथितयश डॉ. विनोद कोतकर उपस्थित राहणार आहेत. दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी प्रथम दिवशी उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, अंकुर वाडमय पुरस्कार वितरण, परिसंवाद , निमंत्रितांचे कवी संमेलन आणि रात्री उपस्थितांचे कवी संमेलन होणार आहे.परिसंवादात चाळीसगावचे पर्यावरण मित्र शालिग्राम निकम सर सहभागी होतील. या संमेलनासाठी चाळीसगावातील नामांकित कवी रमेश पोतदार , प्रा.शामकांत निकम, विनोद पिंगळे ,लालचंद गायकवाड,बी एम मालपुरे ,सोमेश्वर कासार ,मंगला कुमावत ,सुरेखा गुरव, मनीषा वाणी, निर्मला पवार व गणेश निकम इत्यादी कवी सहभागी होतील .दि २४ डिसेंबर२०२३ रोजी गजल मुशायरा होईल त्यात चाळीसगावचे प्राचार्य शिवाजीराव साळुंखे सहभागी होणार आहेत .तदनंतर महिला कवी संमेलन होईल . कथाकथन प्रकारात चाळीस गावचे कवी सुनील गायकवाड सहभागी होतील . सायंकाळी या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. सर्व साहित्यीक, कवींना स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल . तरी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व साहित्य रसिकांनी आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी अकोला येथे उपस्थित रहावे असे जिल्हाध्यक्ष शालिग्राम निकम ,जिल्हा सचिव रमेश पोतदार व कार्याध्यक्ष प्रा. शामकांत निकम कळवितात.