आशाताई बच्छाव
जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते ‘किमया गृपचा ‘ यथोचित सन्मान
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील……..…………………………………..
निसर्गा प्रतिचे वैचारिक स्पंदन म्हणजे “किमया गृप “.नगर परिषद चाळीसगाव तफै पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी संस्था -” किमया गृप ” चा सन्मान जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांनी केला .किमया गृपचे पदाधिकारी पर्यावरण मित्र शालिग्राम निकम व कोमलसिंग जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . यावेळी प्रांताधिकारी श्री प्रमोद हिले साहेब , मुख्य अधिकारी श्री ठोंबरे साहेब , नायब तहसिलदार जितेंद्र धनराळे,आरोग्य व पर्यावरण अधिकारी निकम साहेब उपस्थित होते .चाळीसगाव शहर व पंचक्रोशीतत जवळपास ३००० झाडे लावणे, त्यांचे संगोपन व संवर्धन करणे , वृक्षारोपण संबधी प्रचार व प्रसार करणे , देशी वृक्षाचे वाटप करणे , राष्ट्रीय सण , वसुंधरा दिन , जागतिक पर्यावरण दिन , जल दिन, वन्य व पर्यावरण सप्ताह साजरा करणे , वृक्षदिंडी काढणे , पर्यावरण साहित्य प्रदर्शन भरविणे , वाढदिवसाला वृक्ष भेट देणे , दशक्रिया विधीला वृक्षदान करणे अशी कामे लोकसहभागातून करून अल्पावधीच ‘किमया गृप ‘संस्था नावारूपाला आली . त्यासाठी वृक्षमित्र आप्पा भालेराव , प्रा.राजेंद्रसिंग पाटील, आबासाहेब कच्छवा, शांताराम पाटील व इतर पदाधिकारी करीत आहे .
या गौरवामुळे किमया गृप ला आधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे .