Home भंडारा शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे विमा कंपनीकडून पिक विमा नुकसान देऊन धान खरेदी...

शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे विमा कंपनीकडून पिक विमा नुकसान देऊन धान खरेदी केंद्र सुरू करा

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231207_081746.jpg

शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे विमा कंपनीकडून पिक विमा नुकसान देऊन धान खरेदी केंद्र सुरू करा

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्यात व परिसरातील प्रत्येक धानउत्पादक शेतकऱ्यांकडून विमा काढलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतपिकाची पाहणी करून ज्यांचे ज्यांचे पिकाचे रोगाच्या प्रादुर्भावामुळे किंवा नैसर्गिक रित्या नुकसान झालेले आहे तसेच अवकाळी पावसामुळे जे पिकाचे नुकसान झालेले आहे त्या करिता पिक विमा कंपनीने ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई देण्यात यावी. कारण सर्व धान उत्पादक शेतकरी धानावरच वर्षभराचा उदारनिर्वाह करतात. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आणि शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना सुध्दाही धान उत्पादक शेतकऱ्यानीं धान विकण्यासाठी खाजगी आणि सरकारी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे त्यांनी धान कुठे विकायची ही सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे .आणि जे काही खाजगी धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत त्या खरेदी केंद्रावर सरकारच्या नियमानुसार जे 40 किलो कट्ट्यावरती अर्धा किलो धान घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी खाजगी धान खरेदी केंद्र हे एका 40 किलो कट्ट्याच्या मागे सरकारी नियमानुसार जेवढे वाढीव धान्य घ्यायला पाहिजे त्यापेक्षा नऊ दहा पट म्हणजे जवळपास तीन तीन चार चार किलो जास्त धान घेऊन शेतकऱ्यांची लुबाळणूक करत आहेत. यावर सुद्धा आळा घालण्यात यावा. जे खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या पीक मालाची लुबाळणूक करत आहेत अशा खरेदी केंद्राची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या 7 दिवसाच्या आत सोडवण्यात याव्या अन्यथा सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी साहेब भंडारा, जिल्हा पणन अधिकारी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ,, जिल्हा कृषी निरीक्षक भंडारा ,राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनातून अभय रंगारी राष्ट्रीय किसान मोर्चा भंडारा ,भोजराज गभणे चैतराम सेलोकर यांनी निवेदनातून केलेली आहे.

Previous articleतुमसर तालुका न्यायालयात महापरिनिर्वाण दिन
Next article‘ युद्ध नको,जगाला बुद्ध हवा ‘ अशी शिकवण देणारे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर: राहुल डोंगरे ( शारदा विद्यालय येथे प्रतिपादन )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here