आशाताई बच्छाव
ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरातील झाडांना मिळणार नवी ओळख…
झाडांची गणना व जिओ टॅगिंग द्वारा झाडांचे होणार संवर्धन….
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात ओसाड व पडीक पंचविस हेक्टर क्षेत्रात टप्याटप्याने सोमनाथ माळी यांचे संकल्पनेतून सामाजिक वनिकरण विभाग व लोकसहभागातून दोन वर्षापासून पंचविस हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सध्या परिसरात भिषण दुष्काळ परिस्थिती आहे.
निसर्गटेकडी परिसरातील ही झाडे जगवण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. सेवा सहयोग फाऊंडेशन,एच.एस.डी.आय.च्या आर्थिक मदतीने येथील झाडांची देखभाल व संवर्धन पुढील काळात केले जाणार आहे. या अंतर्गत झाडांची गणना, झाडांचे जिओ टॅगिंग, खत,पाणी देणे,देखरेख ई.अक्टिव्हिटीज राबविण्यात येणार आहेत.
यासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंत सोनवणे, महेश चव्हाण, तुषार निरगुडे, मनिषाताई शेलार तसेच भिला पाटील,सुचित्राताई पाटील, जलमित्र परिवाराचे शशांक अहिरे,सामाजिक वनिकरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली व सेवा सहयोग ग्रामोदयचे पंकज राठोड,
निसर्गटेकडीचे वृक्षमित्र विलास चव्हाण, किशोर चव्हाण, जिता चव्हाण, छोटू राठोड आदींच्या परिश्रमातून झाडांचे संगोपन व संवर्धन होणार आहे.
निसर्गटेकडी प्रकल्प हा खान्देंशातील एकमेव प्रकल्प म्हणता येईल ज्या साठी शेकडो हात सरसावून मदत देत आहेत.