Home अमरावती तीर्थक्षेत्र रिद्धपूर समोरील जालनापूर या मुख्य रोडवरील पुल बांधकाम करिता निधी उपलब्ध...

तीर्थक्षेत्र रिद्धपूर समोरील जालनापूर या मुख्य रोडवरील पुल बांधकाम करिता निधी उपलब्ध करावा या करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा जिल्हाध्यक्ष खा अनिल बोंडे यांना नगरसेविका अक्षरा लहाने यांनी निवेदन दिले

149

आशाताई बच्छाव

Screenshot_20231015-060418_WhatsApp.jpg

तीर्थक्षेत्र रिद्धपूर समोरील जालनापूर या मुख्य रोडवरील पुल बांधकाम करिता निधी उपलब्ध करावा या करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा जिल्हाध्यक्ष खा अनिल बोंडे यांना नगरसेविका अक्षरा लहाने यांनी निवेदन दिले

चांदूरबाजार,(मयुर खापरे तालुका प्रतिनिधी )

अचलपूर मतदारसंघातील तालुका चांदूरबाजार येथील जालनापूर हे गाव गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असून गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्या लागत आहे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या रिद्धपूर गावासमोरील मौजा जालनापुर या रोडवरील मुख्य पूल बांधकाम करणे अत्यंत गरजेचे असल्याने पावसाळ्यात या गावच्या नदीला पूर आल्याने गावकऱ्यांचा अनेकदा संपर्क तुटतो. वृद्ध अपंग तसेच शालेय विद्यार्थ्यांना रहदारी करिता पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर्षी तर 90 दिवसानंतर पहिल्यांदा एस टी महामंडळाची बस भाजप कार्यकर्त्याच्या मागणीनुसार सुरू झाली या मुख्य पुलाचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे असल्याने नगरसेविका अक्षरा लहाने यांनी गावात भेट दिली असता नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्याबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोन्डे यांना निवेदन देऊन मुख्य पूल बांधकाम करिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी नगरसेविका जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा अक्षरा लहाने यांनी केली.

Previous articleभुजबळ टार्गेट, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा 22 तारखेला, मनोज जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा
Next articleवाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.