आशाताई बच्छाव
तीर्थक्षेत्र रिद्धपूर समोरील जालनापूर या मुख्य रोडवरील पुल बांधकाम करिता निधी उपलब्ध करावा या करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा जिल्हाध्यक्ष खा अनिल बोंडे यांना नगरसेविका अक्षरा लहाने यांनी निवेदन दिले
चांदूरबाजार,(मयुर खापरे तालुका प्रतिनिधी )
अचलपूर मतदारसंघातील तालुका चांदूरबाजार येथील जालनापूर हे गाव गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असून गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्या लागत आहे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या रिद्धपूर गावासमोरील मौजा जालनापुर या रोडवरील मुख्य पूल बांधकाम करणे अत्यंत गरजेचे असल्याने पावसाळ्यात या गावच्या नदीला पूर आल्याने गावकऱ्यांचा अनेकदा संपर्क तुटतो. वृद्ध अपंग तसेच शालेय विद्यार्थ्यांना रहदारी करिता पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर्षी तर 90 दिवसानंतर पहिल्यांदा एस टी महामंडळाची बस भाजप कार्यकर्त्याच्या मागणीनुसार सुरू झाली या मुख्य पुलाचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे असल्याने नगरसेविका अक्षरा लहाने यांनी गावात भेट दिली असता नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्याबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोन्डे यांना निवेदन देऊन मुख्य पूल बांधकाम करिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी नगरसेविका जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा अक्षरा लहाने यांनी केली.