आशाताई बच्छाव
धर्माचे स्टेटस ठेवल्याने स्वतःचे स्टेटस उंचावत नाही -पंकज वानखेडे
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटने तर्फे तरुण – तरुणीं ना आवाहन .
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)
सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवून अनेक जण स्वतःला कट्टर धर्मवादी समजत आहेत व तसे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु धर्मा- धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या स्टेटस ठेवल्याने माणसाचे स्टेटस उंचावत नाही तर शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेल्याने आपले स्टेटस उंचावते. तरुण पिढीने स्वतः च्या जातीचा अभिमान बाळगला पाहिजे परंतु आपल्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावतील किंवा जातीय तणाव निर्माण होईल अशा स्टेटस ठेवून स्वतःचे भवितव्य अंधाकारमय करून घेऊ नये , असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष पंकज दिलीपराव वानखेडे यांनी केले आहे.
“हिंदू मुस्लिम शीख इसाई…हम सब हैं भाई – भाई….”
‘”हम सब एक है'” या म्हणी प्रमाणे एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणे ही भारत देशाची संस्कृती आहे. देश आपला आहे, संस्कृती आपली आहे त्यामुळे तीचे संरक्षण करणेही आपलीच जबाबदारी आहे. परंतु काही विघ्नसंतोषी समाजकंटकाच्या नादी लागून तरुण पिढी स्वतःला कट्टर सिद्ध करण्यासाठी एकमेकांच्या धर्माचा अवमान करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर टाकत आहेत . त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागत आहेत. गुन्हे दाखल झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाचे आयुष्य अक्षरशः संपुष्टात येत आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणाला कुठल्याही शासकीय नोकरीसाठी पोलिसांकडून मिळणारे कॅरेक्टर सर्टिफिकेट (चारित्र्य प्रमाणपत्र) मिळणार नाही, त्याला पासपोर्ट – विसा सारख्या सुविधा मिळणार नाहीत. तसेच पोलीस ठाण्यात त्याचे वाईट चारित्र्य असल्यामुळे कोणत्याही धार्मिक उत्सवाच्या वेळी त्याला हद्दपार सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. जेणेकरून तो कोणतीही धार्मिक उत्सव आपल्या कुटुंबासोबत घरी साजरा करू शकणार नाही.
कोणतेही जातीय तेढ निर्माण करणारे कृत्य करण्या अगोदर आई, वडील, घरातील मंडळी तसेच आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार एक वेळ आवश्यक करावा .
सध्या सर्वत्र व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून १६ ते २२ वर्ष वयोगटातील तरुण एक दुसऱ्याच्या धर्मा विरोधात बोलत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत सामाजिक सलोखा लोप पावत आहे आणि यातूनच विनाकारण जातीय दंगली घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शांतता — सु – व्यवस्था ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे , असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी केले.