आशाताई बच्छाव
कृषी विभागाने निश्चित केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास मजीप्राची टाळाटाळ.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी .एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
वझर येथील सापन प्रकल्पातून चांदूरबाजार आणि अचलपूर मधील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ८३ गावांना पाणीपुरवठा योजना जात आहे या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालया अंतर्गत नेमलेले एजन्सी पी.पी.गोगडयांनी केले.
दुर्लक्षामुळे २९ जुलै रोजी जलवाहिनी नादुरुस्त झाली. परिणामी लाखो लिटर पाणी नजीकच्या अनिल पितळे यांच्या वडूरा गट नं.६० मधील शेतात शिरले. त्यामुळे शेतातील संत्रा व तू या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई बाबत तलाठी यांनी पंचनामा सुद्धा केला होता. मजिप्रा कार्यालयाने कृषी विभागाने नुकसानाचे मूल्यांकन बाबत ४ ऑगस्ट रोजी पत्र देत अहवाल मागितला होता. कृषी विभागाच्या अहवालानुसार अनिल पितळे यांच्या शेतातील संत्र पिकाचे २ लाख ६ हजार रुपये तर तुर पिकाचे१ लाख २६ हजार असे नुकसान झाल्याचे मूल्यांकन पत्र सुद्धा देण्यात आले आहे. तरीही मजिप्रा व कंत्राटदारी हे नुकसान भरपाई देण्यास दीरंगाई करत आहे. अचलपूर तालुक्यात या योजनेचे काम करणारी कॉन्ट्रॅक्टदार एजन्सी पी.पी.गोगड यांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतात जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान केले असून तालुक्यातील जिल्हा परिषद व बांधकाम विभागाच्या रस्त्याची ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शिवाय ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचेही नुकसान केले आहे. तरीसुद्धा मजीप्रा व येथील जनप्रतिनिधी या कॉन्ट्रॅक्टदाराला का पाठीशी घालत आहे असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी विचारत आहे. अनिल पितळे यांचे वडूरा शेतशिरावर तील गट नं.६० येथील १.२० हेक्टर वरील संत्रा व तूर पिकाचे नुकसान झाले होते. कारण त्यांच्या शेतात जाऊन गेलेली जलवाहिनी मजिप्रा व लक्षात त्यामुळे चाचणीच्या नावावर ना दुरुस्त होऊन झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. याबाबत तसा पंचनामा करण्यात आला होता. संबंधी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण यांना १३ सप्टेंबर रोजी तशी तक्रार नोंदवली होती. परंतु नुकसान भरपाई देण्याला मात्र हे कार्यालय टाळाटाळ करीत आहे.