आशाताई बच्छाव
हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.
जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर-मुक्ताईनगर तालुक्यासह नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
धरणाखाली भुसावळ, यावल, चोपडा, अंमळनेर, जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, या सर्व तालुक्यातील नदी काठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हतनुर धरणातून चार लाख क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येणार असे नियोजन करण्यात आलेले आहे.
तसेच सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदी काठच्या गावी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी बोटी तसेच पट्टीचे पोहणारे नावाडी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी तत्पर आणि बाबत कळविले आहे.
सतर्कतेचा इशारा.
पाण्याचा विसर्ग वाढल्याने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्याने नागरिकांनी नदीपात्रा लगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.