आशाताई बच्छाव
देवळा – सटाणा महामार्गावर कांदा चाळ तोडुन कंटेनेर थेट शेतात
मनोहर देवरे ( प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)
देवळा ते सटाणा या राष्ट्रीय महामार्गावर लोहोणेर येथिल पार्वतानंद लॉन्स जवळील रस्त्यावरील वळणावर झालेल्या अपघातात कंटेनरने कांदा चाळीचे नुकसान केले आहे. सम्पूर्ण कांदा चाळ तोडून कंटेनर रस्त्यालगतच्या शेतात गेल्याने नव्याने लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत देवळा पोलिसांत मोटार अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी (२३) रोजी देवळा सटाणा रस्त्यावर सटाण्याच्या दिशेने जात असलेले कंटेनर रस्त्याच्या कडेला वळणावरील असलेल्या वटवृक्षाच्या पारंब्यामुळे रस्त्यालगत असलेल्या कांदा चाळिवर जाऊन धडकल्याने यात संपूर्ण कांदा चाळ नेस्तनाबूत झाली. चाळ तोडून कंटेनर थेट शेतात जाऊन उभे राहिले या गंभीर अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या मार्गावर, अगदी रस्त्याला लागून असलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या व पारंब्या मुख्य रस्त्यावर आल्याने दुचाकी, चारचाकी, व अवजड वाहने चालविणे अंत्यत धोकादायक व जिकिरीचे झाले आहे, सोमवारी (२३) रोजी रात्री एक अवजड कंटेनर सदर वटवृक्ष व पारंब्या टाळण्याचा नादात रस्त्यालगत असलेल्या कांदा चाळीवर जावुन धडकले, त्यामुळे १०० ते १५० फुट लांबीच्या कांदा चाळीचे नुकसान झाले आहे, येथील प्रगतिशील शेतकरी व पार्वतानंद मंगल कार्यालयाचे मालक दौलत आनंदा बच्छाव यांच्या कांदा चाळीचे व शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने चाळीत नेहमी मुक्कामी असलेले मजुर तेथे नसल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान , या रस्त्यावर आलेल्या वडाच्या झाडाच्या पारंब्या अपघातास कारण कारणीभूत ठरत असून,
सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन व वरिष्ठ अभियंता यांनी या विषयी तातडीने लक्ष घालुन रस्त्यावरील वडाची झाड व पारंब्या त्वरित हटवण्यासाठी तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव, सामाजिक कार्यकर्ते विनोद आहेर यांनी सा.बा. विगाचे अभियंता मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.