Home नाशिक आदिवासी भागात घरा देव आदीम पध्दतीने केला जातोय साजरा

आदिवासी भागात घरा देव आदीम पध्दतीने केला जातोय साजरा

162

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0075.jpg

युवा मराठा न्यूज नेटवर्क

निलेश भोये भिमखेत

आदिवासी भागात घरे देव आदिम पद्धतीने साजरा केले जाते
नवरात्र म्हटलं की दांडिया गरबा असे विविध नुत्य चित्र डोळ्यासमोर उभे राहतात परंतु आदिवासी भागात पारंपारिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो हे उत्सव वेगळ्याच पध्दतीने साजरे केले जाते तर पाहुया सटाणा तालुक्यामध्ये पश्चिम भागातील ग्रामीण पट्ट्यात कोकणा कोकणी समाजामध्ये घरे देव बसवले जातात.हे देव चांदी आणि तांब्याच्या पत्र्यावर यामध्ये घडवलेले जातात महादेव बिरोबा देव विष्णू देव बहिरम देव नागदेव वाघदेव चांद सूर्या तसेच मयत पूर्वज यांना चांदीच्या किंवा तांब्याच्या पत्र्यावर घडवून मातीच्या किंवा लाकडाच्या देव्हाऱ्यात ठेवून पूजा अर्चना करून आदिवासी पद्धतीने नऊ दिवस ढाक वाजून जागरण केले जाते यास गऱ्या देव असे म्हणतात दसऱ्याच्या दिवशी शेवट असतो या दिवशी देवांना नदीवर आंघोळीसाठी घेऊन जातात वाजत गाजत किंवा महिला मंडळी गाणे म्हणून योग्य विधी वाट पद्धतीने करून सांगता केली जाते असे पारंपारिक पद्धतीने आदिवासी भागात नवरात्र उत्सव साजरे केले जातात

Previous articleघटनेत राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या नाही!
Next articleसंग्रामपूर तहसीलदार विरुद्धच्या तलाठी काम बंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! वरिष्ठांकडून होणार चौकशी.?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.