आशाताई बच्छाव
जिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळ वगळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
(परभणी)जिंतूर :-पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील बामणी मंडळात पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाकडून पीकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मंडळातील ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बहरलेली पिके सुकून लागली शेतकरी हतबल झाला. असून या वर्षी खरीप पेरणी साठी सुरुवातीला योग्य पाऊस झाला त्यानंतर खरिपाची पिके चांगली बहरलेली होती पण मधेच
अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्याने शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती आणि जमिनीचे पडल्या होत्या त्यानंतर पावसाने खंड दिला. पिके फुलोऱ्यात असताना करपली गेली त्यामुळे पिके वाळली शेतकरी हतबल झाला. आणि नुकसान भरपाई साठी मागणी करू लागले पंचवीस दिवस पावसाचा खंड असेल तर त्या स्थितीत नुकसान ग्राहय धरले जाते असा शासन अनुमान आहे. परंतु
लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी १० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत पंधरा दिवस खंड असणाऱ्या महसूल मंडळाचा अहवाल मागवला होता. परंतु जिंतूर तालुक्यातील अनेक मंडळांचा यात समावेश असताना बामणी मंडळ वगळले गेले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे बामणी मंडळाचा ही सदर मंडळामध्ये समावेश करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे याबाबत तहसीलदार जिंतूर यांना निवेदन देणार असल्याची माहिती शेतकऱ्याकडून मिळत आहे.