आशाताई बच्छाव
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीशी फोन द्वारे संपर्क होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड-जून व जुलै महिन्यात तीन-चार वेळा अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस तर गरज असताना पावसाची दडी व पुन्हा जोरदार पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सदर नुकसानीची माहिती विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळविणे आवश्यक असते. मात्र विमा कंपनीचा फोन नो रिप्लाय येत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने देखील मुखेड तालुक्यातील जाहूर, अंबुलगा बु. मंडळात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने जमिनीसह पिके खरडून गेल्याने या भागातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.