आशाताई बच्छाव
गडचिरोली मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या चुरचुरा येथील महिलेस वाघाने केले ठार..
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात 29 ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला करुन शेतकऱ्यास ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज 30 ऑगस्ट रोजी एन हरतालीका दिनी गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या पोर्ला वनक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या चुरचुरा जंगल परिसरात आपल्या पतीसह गुरे चारण्याकरीता गेली असता गुराखी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकिस आली पार्वता नारायण चौधरी (60)असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,पार्वती नारायण चौधरी हि जंगल परिसरात आपल्या पतीसह गुरे चारण्याकरीता गेली होती. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वता चौधरी वर हल्ला करून नरडिचा धोट घेतला यात ती ठार झाली घटनेची माहिती गावकर्यांनी वनविभागाला दिली.
जिल्हात दिवसेदिवस वाघाचे मानवावरील हल्ले वाढत असल्याने मानव वन्यजीवन संघर्ष होण्याची शक्यता असुन नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी वांरवार मागणी नागरीकांकडुन करण्यात येत आहे.माञ वनविभाग यात सपसेल अपयशी ठरत आहे.सततच्या घटनेने वनविभागाप्रती नागरिकांकडुन संताप वेक्त करण्यात येत आहे.