आशाताई बच्छाव
_जागतिक विकासासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी, विकसित भारत बनविण्यासाठी आपले मत कमळालाचं देऊन विजयी करा_..
खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन..
—————————————-
_विजयाचा संकल्प करत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांची तिसऱ्यांदा विजयी करा_.
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मतदारांना आवाहन.
—————————————-
_महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विधमान खासदार अशोक नेते व महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आसरअल्ली येथे जाहिर सभा संपन्न…_
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
आसरअल्ली:-दिं.१९ एप्रिल २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुक, मतदान निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे आज दि.०३ एप्रिल २०२४ रोज बुधवारी जाहीर सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या जहिरसभेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री. अशोक नेते, तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जेष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार,जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी ,रवी रालबंडीवार, गजानन कलक्षेपवार, श्रीकांत सुगरवार, भास्कर गुडीमेटला,सतीश गांजिवार,विशवेश्वर कोंड़्ा, सतिश बोगे,नागरेड़्डि गुडीमेटला, श्रीनिवास गोतुरी व भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारो संख्येच्या उपस्थित होते.
मंत्री मा.धर्मराव बाबा आत्राम यांनी जाहिर सभेत बोलतांना म्हणाले उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार चे बाहेरचे पार्सल उमेदवार आहेत.आपल्या क्षेत्रात त्यांचा कुठेही संबंध नाही त्यामुळे याचा पराभव निश्चित आहे.यावेळी अब कि बार चारसौ पार करित माझ्या अहेरी विधानसभेत भरपुर मताने लीड देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकजी नेते यांचा विजय निश्चितच होईल असा विश्वास व्यक्त करतो. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जाहिर सभेत संबोधीत केले.
————————————-
_आसरअल्ली च्या जाहीर सभेला खासदार अशोक नेते_ यांनी संबोधीत करतांना म्हणाले प्रधानमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर जागतिक विकासाकडे भारताची वाटचाल प्रगती पथावर आहे.मि केंद्रातुन अनेक विकाbiस कामे खेचून आणले आहे.ज्यात रस्त्यांचे काम असेल, नॅशनल हायवे असेल, रेल्वे चा प्रश्न असेल,सिंचनाचा प्रश्न असेल, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प असे अनेक कामे माझ्या प्रयत्नाने मंजूर करून घेण्यात सिंहाचा वाटा आहे.एवढचं नाही तर
पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी या दहा वर्षात ऐतिहासिक निर्णय घेत जागतिक विकासासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी,भारत विकसित बनविण्यासाठी, पुन्हा एकदा सेवा करण्यासाठी आपले मत कमळालाचं द्या व विजयी करा. यासाठी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय असे प्रतिपादन खासदार अश़ोक नेते यांनी या जाहिर सभेच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.
————————————–
माजी जि.प अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी आपले विचार व्यक्त करतांना १७ एप्रिल या तारखेला ला श्रीराम नवमी आहे. श्रीराम चा नारा देऊन दि.१९ तारखेला कमळालाचं मतदान करुन विजयी करावे असा शुभ संदेश देत जय श्रीराम व वंदे मातरम् चा नारा देत आपल्या शब्दाला विराम दिला.
————————————
यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेला यांनी सूद्धा जाहिर सभेला मार्गदर्शन केले.