आशाताई बच्छाव
रेशन कार्डधारकांनो सावधान; १ तारखेपासून तुमच्यावर मोठे गंडातर!
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________
शासनाने एक मोठा धाडसी निर्णय घेतलेला असून,त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२२ पासून केली जाणार आहे,त्यामुळे आपल्यावर मोठे गंडातर येण्याची दाट शक्यता आहे.जे रेशनकार्डधारक अन्न सुरक्षा योजनेचा दरमहा लाभ घेऊन रेशन घेत आहेत,अशा लाभार्थीमध्ये शासकीय नोकर,निमशासकीय नोकर,व्यावसायिक,किराणा दुकानदार,पेन्शन धारक,ट्रँक्टर असणारे बागातदार शेतकरी,मोठ मोठ्या कंपनीत काम करणारे,तसेच साखर कारखान्यात परमंन्ट असणारे कामगार,आयकर भरणारे,पक्के घर (स्लँब बिल्डींग) असणारे,चारचाकी वाहन(घरगुती अथवा व्यावसायिक ) असणाऱ्या रेशनकार्डधारकांनी ३१ आँगस्ट २०२२ पर्यत स्वतः स्वइच्छेने अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडावे व तसा फाँर्म भरुन द्यावा.अन्यथा १ सप्टेंबर २०२२ पासून तलाठी व मंडल अधिकारी गावागावात शहनिशा करुन अपात्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावानुसार रक्कम वसूल करुन फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.तर या मोहिमेची सुरुवात पुणे जिल्ह्यातून सुरु करण्यात आली आहे.