आशाताई बच्छाव
50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल -मंत्री दीपक केसरकर रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
सध्या विधिमंडळाचं अधिवेशन होतंय. अश्यात 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत.एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पैसे देण्यात आले. 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय. 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल, असं दीपक केसरकर म्हणालेत. “सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतलेले असलेले तरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो”, असं केसरकर म्हणाले.