आशाताई बच्छाव
९ अगस्त क्रांती दिन आणी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त लांजा येथील स्व. स्वातंत्र सेनानी शिवाजीराव सावंत लांजा तालुका सहकारी संस्थेने आयोजित केला गुणगौरव सोहळा
या वेळी कार्यक्रमाची सुरूवात स्व. शिवाजीरावांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलनाने झाली या वेळी सर्व स्वातंत्र वीराना व भारतीय शरवीर जवानांना श्रद्धांजली वाहणयात आली. सचिन भिंगार्डे यांनी यथोचीत स्वागत केले . तर राजू धावणे यांनी प्रस्तावना करतांना क्रांती दिन आणी भारतीय स्वातंत्र चळवळ यांचा आढावा घेतला या वेळी झालेल्या कार्यक्रमात लांजा तालुक्यातील कोर्ले येथील स्वातंत्र सैनिक भगवानराव साळुंखे यांच्या पत्नी श्रीमती सुमती भगवान साळूंखे यांचा साडीचोळी व स्फुर्ती चिन्ह देउन यथोचित गौरव करण्यात आला तसेच लांज्याचे नाना वंजारे यांचे चिरंजिव श्री. भाऊ वंजारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी ऊपस्थित माजी सैनिक कॅ.नामदेवराव पाटोळे .सुहास पुरात रामदास वाघाटे माजळचे चव्हाण यांचा स्फुर्ती चिन्ह देउन यथोचित सत्कार करण्यात आला याच वेळी उपस्थित तहसिलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांजा तलाठी लांजा प्रणाली रंडीज शामराव पेजे ट्रस्ट लांजा काॅलेज लांजा हायस्कुल बिडीओ लांजा शिक्षणाधिकारी बाल कल्याण नगरपंचायत याचाही र्सन्मान करण्यात यावेळी सत्काराला ऊत्तर देतांना मा. तहसिलदार मा . प्रमोद कदम म्हणाले जेष्ठ स्वातंत्र सेनानी शिवाजीराव सावंत यांनी स्वातंत्र लढ्यात तरूण पणीच ज्या हिरहिरीने आणी ऊत्साहाने भाग घेतला तीच प्रेरणा जोश घेऊन गोवा मुक्ती संग्राम व जंजिरा मुक्ती संग्रामात भाग घेतला अश्या स्वातंत्र वीरांचे ऋण फेडणे अशक्य आहे.
त्यांच्या नावाने हा उपक्रम संस्थेने केला ही बाब स्पृहनीय आणी अभिनंदनीय आहे स्व. शिवाजीरावांच्या विकासाच्या कल्पनांवर योग्य दिशेने निष्ठेने ही संस्था वाटचाल करीत आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे त्यांनाही शुभेच्छा या नंतर संस्थेचे अध्यक्ष विवेकराव सावंत यांनी ९आॅगस्ट क्रांतीदिनाच्या व अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम करतांनाची भुमिका विषाद केली . ज्या लहान थोर स्वातंत्र वीरांनी स्वातंत्र मिळवण्यासाठी अपार कष्ट घेतले हाल अपेक्षा सहन केल्या त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा तसेच अपरंपार कष्टाने मिळालेले स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी ज्या भारतीय शरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांची आठवण चिरंतर ठेवली पाहिजे . मिळालेले स्वातंत्र शेवटच्या माणसापर्यंत पोहचले पाहीजे या सर्वांनी कटिबद्ध होउया . या निमित्ताने मी संस्धेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा देतो. या नंतर हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऊपस्थितांना तिरंगा झेेंडा देउन. राष्ट्रगीत होऊन कार्य क्रम संपला