Home रत्नागिरी राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमाला

राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमाला

24
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0022.jpg

राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमाला

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानाचा कार्यक्रम झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात झाला.

स्वातंत्र्यपूर्व काळातही मुले गुरुकुलमध्ये जाऊन शिकत असत. मातृभाषेत शिक्षण घेत असत. ब्रिटिश राजवट आल्यावर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजी माध्यमाचा प्रभाव वाढू लागला. संस्कार संस्कृतचा विसर पडला. उत्तम नागरिक निर्माण झाले पाहिजेत, असे फाटक हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका प्रतिभा प्रभुदेसाई यांनी प्रतिपादन केले.

सी. ए. वैभव देवधर यांनी आर्थिक प्रगती यावर आपले विचार मांडले. भारत- पाकिस्तान फाळणीमुळे आपले खूप आर्थिक नुकसान झाले. पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. आर्थिक प्रगती २०१७ सालापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली म्हणजे आपण अन्य काही देशांना आर्थिक मदत देऊ शकलो.

क्रीडा क्षेत्रातील प्रगती यावर ज्येष्ठ क्रीडा संघटक संदीप तावडे यांनी विचार मांडले. २०१४ सालापासून क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले व त्याचा चांगला परिणाम ऑलिंपिकमध्ये दिसून आला. मुलांच्या १२ ते १४ हेच वय क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याच्या दृष्टीने योग्य आहे, असे त्यांनी सांगितले. दळणवळणाविषयी बोलताना निवृत्त मुख्याध्यापक आनंद मराठे यांनी दळणवळणाच्या विविध साधनांची प्रगती याविषयी आपली मते मांडली.

कृषी क्षेत्रातील प्रगती सांगताना डॉ. दिलीप नागवेकर यांनी आपल्या कोकणातील शेतीविषयक धोरणांचे विवेचन केले. आपला शेतकरी शहराकडे वळला आणि शेतीकडे दुर्लक्ष झाले. शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आल्या. शेतीत आधुनिकता आली. वाहतुकीमुळे शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळाला. परंतु अनेक अडचणींना सध्या शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

अष्टगंध लावून रक्षासूत्र बांधून नारळवडी देऊन स्वागत करण्यात आले. भारताच्या मानचित्रासोबत ७५ पणत्या भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची शोभा वाढली. स्नेहा बिजरगी यांनी विष्णूमय जग हा श्लोक सादर केला. जुई डिंगणकर हिने ए मेरे वतन के लोगो हे गीत सुरेख म्हटले. सूत्रसंचालन सुनेत्रा जोशी यांनी केले. प्रत्येक दोन व्याख्यानांच्या मध्यंतरामध्ये श्लोक, देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. सार्थक केळकरने भारत ये रहना चहिये हे गीत सादर केले. आदिती काजरेकर आणि आर्या मुळे यांनी श्लोक सादर केले. अलका भावे यांनी देवभूमी भरतभू हे गीत सादर केले. प्रिया केळकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here