आशाताई बच्छाव
संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादच्या वान नदी पुलावरून पाणी असल्यामुळे रस्ता बंद गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात ! प्रशासन मात्र झोपेत..?
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपूर :- तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत मधील ग्राम मोमीनाबाद या गावाला जाण्या-येण्या करिता रिंगणवाडी व मोमीनाबाद दोन्ही गावाच्या मध्ये वान नदीवर असलेल्या फुलाची उंची मुळात कमी आणि त्यापुढे हाकेच्या अंतरावर झालेला वान नदीपात्रातील नवीन “बंधारा” हा शाप की वरदान? कारण बंधाऱ्यामुळे गावच्या पाणी पातळीत वाढ तर झाली, पण मागच्या जवळपास आठ ते दहा दिवसापासून वान नदीवरील पुलावरून पाणी असल्याने मोमिनाबाद ते वरवट हा मुख्य संपर्क तुटला त्यामुळे गावात आजारी असलेल्या पेशंटची खूप हेळसंद होत असून आजारी असलेल्या पेशंटला वरवट बकाल येथे उपचारासाठी नेण्याकरिता खांद्यावर घेऊन पुलावरून असलेल्या पाण्यातून जीव मोठीत धरून पार करावे लागते.
आणि गावची मुख्य ओळख असलेल्या केळी पिकाचेही खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून शेतात एक वर्ष राबवून आता काढणीला आलेली केळी शेतात सडते की काय.?
असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. तरी लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे असून संबंधित ग्रामपंचायतने सुद्धा मोमिनाबाद येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नवीन उंच पुलाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करणे गरजेचे असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.