आशाताई बच्छाव
आजादी का अमृत महोत्सव ग्रामसभेत महापुरुष अवतरले
विष्णु डाखुरे कोरवाडीकर ( तालुका प्रतिनिधी )
जिंतूर तालुक्यातील कोरवाडी गावात दिनांक आठ ऑगस्ट रोजी आजादी का अमृत महोत्सव या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली
15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून केंद्र शासनाने या गौरवशाली वर्षा निमित्त “आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केले असून राज्यात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव साजरा करण्या बाबत सूचना दिले आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहण्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरूपी म्हणत रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने “आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट २०२२ या काळामध्ये देशभरात ” हर घर झेंडा ” हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या काला मधील लावण्यात आलेल्या झेंडे अभियान कालावधी नंतर प्रत्येकानी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. अभियान कालावधीत नंतर झेंडा फेकला जाऊ नये तो सन्मानाने जतन करून ठेवावा अर्धा झुकलेला , फाटलेला , कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये असे आव्हान ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले . सर्व उपस्थित ग्रामसेवक- संदीप बारवे
सरपंच सदस्य- दिनकर आलाटे , वाघू धांगड , मारुती जाधव , विनोद शिंदे , पांडुरंग बनसोडे , अनिल मावई
ग्रामस्थ – रामजी रोकडे, राजू धांगड, रफिक शेख , बाबा वाकळे
प्रवीण लादे ,महेश चव्हाण, रॅप पठाण, घोगरे इतर.