Home परभणी आजादी का अमृत महोत्सव ग्रामसभेत महापुरुष अवतरले

आजादी का अमृत महोत्सव ग्रामसभेत महापुरुष अवतरले

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0033.jpg

आजादी का अमृत महोत्सव ग्रामसभेत महापुरुष अवतरले

विष्णु डाखुरे कोरवाडीकर ( तालुका प्रतिनिधी )

जिंतूर तालुक्यातील कोरवाडी गावात दिनांक आठ ऑगस्ट रोजी आजादी का अमृत महोत्सव या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली
15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून केंद्र शासनाने या गौरवशाली वर्षा निमित्त “आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केले असून राज्यात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव साजरा करण्या बाबत सूचना दिले आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहण्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरूपी म्हणत रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने “आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट २०२२ या काळामध्ये देशभरात ” हर घर झेंडा ” हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या काला मधील लावण्यात आलेल्या झेंडे अभियान कालावधी नंतर प्रत्येकानी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. अभियान कालावधीत नंतर झेंडा फेकला जाऊ नये तो सन्मानाने जतन करून ठेवावा अर्धा झुकलेला , फाटलेला , कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये असे आव्हान ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले . सर्व उपस्थित ग्रामसेवक- संदीप बारवे
सरपंच सदस्य- दिनकर आलाटे , वाघू धांगड , मारुती जाधव , विनोद शिंदे , पांडुरंग बनसोडे , अनिल मावई
ग्रामस्थ – रामजी रोकडे, राजू धांगड, रफिक शेख , बाबा वाकळे
प्रवीण लादे ,महेश चव्हाण, रॅप पठाण, घोगरे इतर.

Previous articleदेवळा तालुक्यात आमदार डाँ.राहुल आहेरांच्या हस्ते ध्वजांचे वाटप
Next articleरस्त्याचे काम आहे की मृत्यू चा सापळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here