आशाताई बच्छाव
रस्त्याचे काम आहे की मृत्यू चा सापळा ठेंगोडा,(नयन शिवदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नाशिक जिल्ह्यातील सटाणा – ताहाराबाद- पिंपळनेर राष्ट्रीय महामार्ग गेल्या ३ वर्षापासुन अर्धवट रखडलेला आहे . रस्त्यांची सर्व कामे अर्धवट पध्दतीने ,निकुष्ठ पध्दतीने होत आहे . झालेल्या कामांची गुणवत्ता व तपासणी कोणीच करत नाही . तर ३,४ किलोमीटरवर अर्धवट पुलाचे व ,मोरीचे काम धोकादायक झाले आहेत . साईडपट्टी वर अर्धवट भराव टाकल्याने अनेक मालवहातुक वहाने अपघात ग्रस्त होत आहे . गेल्या २,३ वर्षात अनेक अपघात होऊन ४०/५० निष्पाप नागरीकांचा जिव गेला आहे . तरी प्रशासनाने सदर रस्ता ठेकेदार ,काँन्ट्रक्टर यांच्यावर कारवाई करावी व सदर रस्ता योग्य पध्दतीने दुरुस्ती करावी NH AI 752 पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील हा Vedio विरगाव जवळील आहे. गेली ३ वर्षापासून रस्त्याचे काम जनतेचा जिव घेण्यासाठी चालु आहे..जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे