आशाताई बच्छाव
ओला दुष्काळ जाहीर करा–संभाजी ब्रिगेड
हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर- मागील आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे, यावर्षी वेळेवर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या पण अचानक गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे काही भागातील पिके नष्ट झाली आहेत
काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे
शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे
शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे
आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना
करावा लागत आहे,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या
पिकाचे पंचनामे प्रशासनाला करायला लावावेत व
शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, तालुकाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे करडखेडवाडीकर,शहराध्यक्ष
अनिल पाटील मलकापूरकर .ता.सचिव देविदास पाटील थडके यांच्या वतीने देगलुर तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.