आशाताई बच्छाव
पिंगळवाडे परिसरात पावसामुळे राहत्या घरांची पडझड.
संदीप गांगुर्डे प्रतिनिधी
पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क
साधारण आठ दिवसापासून होत असलेल्या संततदार पावसामुळे पिंगळवाडे व परिसरात चांगल्या घरांची पडझड होण्यास सुरुवात.
दिनांक ८ जुलैपासून महाराष्ट्रभर होत असलेला अवकाळी व सततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या पावसामुळे संतोष वाघ यांच्या घराची भिंत कोसळल्याने संसार उपयोगी साहित्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या नुकसानीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. विशेष बाब म्हणजे घराची भिंत दुपारच्या वेळेस पडल्याने घरात कोणीही नव्हते. यामुळे सुदैवाने कुठलाही अनर्थ झाला नाही तसेच गावातील इतरत्र घरांचे भिंत पडत असल्याने राहत्या घरांचे फार मोठे प्रमाणात नुकसान होत आहे या सततधार पावसामुळे पांधण रस्त्यांना जणू नदीचे स्वरूप आले आहे. पाण्याचा विसर्ग रस्त्याने होत असल्यामुळे पाई चालणे अवघड होत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करून शाळेपर्यंत यावे लागत आहे. या पांधण रस्त्यांबाबत शासन दरबारी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.परंतु याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. नुकसान झालेल्या घरांची महसूल विभागाचे तलाठी सूर्यवंशी व ग्रामसेवक सुनील ठोके यांनी तात्काळ पंचनामा केला आहे. तरीसुद्धा शासन दरबारी पिडीतांना न्याय मिळावा व त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासनाने वेळीच दखल घ्यावी जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत होईल. व घरकुल योजनेचा निधी जास्तीत जास्त स्वरूपात वाढविण्यात यावा.
सरपंच लताबाई केदा भामरे