आशाताई बच्छाव
संततधार पावसामुळे बेटमोगरा येथील मन्याड नदीस पाण्याच्या पातळीत वाढ होऊन
जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बेटमोगरा-अतिवृष्टी पावसामुळे बेटमोगरा येथील मन्याड नदीतील पाण्याचा पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली असून हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसानीची व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी (IAS) सौम्या शर्मा यांनी बेटमोगरा येथे भेट देवून पूर परिस्थितीच्या आढावा घेतला.तसेच गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी,सरपंच नय्युम दफेदार, उपसरपंच ज्ञानेश्वर तळणे, तलाठी संघटनेचे महा.राज्य सल्लागार उदयकुमार मिसाळे, तलाठी लक्ष्मण गोधणे,तलाठी म्हेत्रे, तलाठी जि.एल.पडोळे, रफीक दफेदार,पत्रकार मुस्तफा पिंजारी आदी उपस्थित होते.